ई-केवायसी म्हणजे काय?

ई-केवायसी ही आधार कार्डाशी जोडलेली ओळखप्रक्रिया असून, त्यामार्फत लाभार्थ्याची खरी ओळख तपासून त्याचे रेशन कार्ड वैध ठरवले जाते. यामध्ये बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन) प्रमाणीकरणाद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई-केवायसी करण्याच्या पद्धती

1) ऑफलाइन पद्धत

राष्ट्रपुरवठा दुकानावर (FPS) जाऊन रेशन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागतो. स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तुमची ओळख पटवतो आणि त्यानंतर ई-केवायसी पूर्ण होते.

2) ऑनलाइन पद्धत

ज्यांना घरी बसून ई-केवायसी करायची आहे, त्यांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात –
सर्वप्रथम ‘Aadhaar FaceRD’ हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.
त्यानंतर तुमचा पत्ता आणि आधार क्रमांक टाका.
मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
त्यानंतर “Face-e-KYC” हा पर्याय निवडा आणि तुमचा चेहरा कॅमेर्‍याने स्कॅन करून अपलोड करा.

ई-केवायसी न केल्यास काय होईल?

ज्या लाभार्थ्यांनी 1 मे 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचे रेशन कार्ड तात्पुरते निष्क्रिय (inactive) करण्यात येईल. यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून स्वस्त धान्य दिले जाणार नाही.